Wednesday, July 1, 2020

ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला - गुरुपौर्णिमा

Add caption
  💮गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
           गुरु साक्षात परंब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः।।💮


गुरुविण नाही दुजा आधार,
रडता पडता कोठे अडता तोच नेतसे पार 
गुरुविण नाही दुजा आधार

गुरु हा प्रत्येकाच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कारण गुरु हा शिष्याला त्याच्या चुका शोधण्यात व त्या सुधारण्यात मदत करतो तसेच त्याच्या कठीण प्रसंगी त्याला आधार देतो. म्हणून ह्या गुरूचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे गुरुपौर्णिमा.

आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला (जुलै - ऑगस्ट दरम्यान) गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी गुरुची पूजा केली जाते. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. पूर्वीच्या काळी विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरुपूजा करून गुरुदक्षिणा देत असे. चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषींची आजच्या दिवशी पूजा करतात, कारण व्यास ऋषींनीच वेदांचे ज्ञान दिले . म्हणून गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील म्हंटले जाते. 

भारतात अनेक शाळा, महाविद्यालय आणि संप्रदाय मध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. महर्षी व्यासांनी वेदांचे ज्ञान जगासमोर उघड केले. व्यासानं भारतीय संस्कृतीमध्ये आद्यगुरू समजले जाते. व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहला आहे. तिथिनुसार यादिवशी महर्षी व्यासांचा जन्मदिवस पण असतो. म्हणून या दिवसाला एक अनन्य साधारण महत्त्व आहे. भारतात पूर्ण काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे. पूर्वीच्या काळी शिष्य गुरुकडे आश्रमात राहत असे. त्याकाळी शिष्य स्वतःचे घर सोडून गुरुकुलात राहत असे. शिष्याला ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्याच्या जीवनातील सुख सुविधांचा त्याग करावा लागतो. ज्ञान प्राप्ती नंतर गुरूला गुरुदक्षिणा देण्यासाठी गुरुपौर्णिमा हा दिवस साजरा केला जातो. आता मात्र गुरुकुल परंपरा फार कमी झाली आहे. तरीही शिष्य आपल्या गुरुकडे ज्ञान घेण्याची प्रथा आजही आहे. त्याचप्रमाणे जीवनातील चांगल्या अथवा कठीण प्रसंगी आजही आपल्या गुरुकडून मार्गदर्शन घेण्यासाठी शिष्य आपल्या गुरूंची भेट घेतात. 

गुरु हे ईश्वराचे रूप असून प्रत्यक्ष भगवंत गुरु रूपाने आपल्या जीवनाची सारथ्य करत असतात. गुरु म्हणजे मार्गदर्शक आणि पौर्णिमा म्हणजे प्रकाश गुरूकडून मिळालेल्या ज्ञानाने जीवन प्रकाशमय प्रत्येकाच्या आयुष्यात कोणतरी गुरु हा असतोच.या जगात कोणीच जन्मताच हुशार नसतो. योग्य अशा गुरुचे मार्गदर्शन, प्रशिक्षण प्राप्त करून हुशार होण्यातच खरी हुशारी आहे. सर्वांच्या आयुष्यतील प्रथम गुरु म्हणजे आपली आई असते. आई आपल्याला चालायला, बोलायला आणि जगायला शिकवते. जगातील प्राथमिक ज्ञान आपण आपल्या आई कडून घेतो. आई प्रमाणेच वडील आणि पुढे अनेक शिक्षक, मित्र, चांगली पुस्तके आपले गुरु असू शकतात. गुरुची महती आपल्या जीवनांत महत्वाची असते. म्हणून आपल्याला लहानपणीपासून 'आचार्य देवो भव ' असे शिकवले जाते.
 
आपल्या आयुष्यात आपण ज्या भगवंताला मानतो तो भगवंत म्हणजे देव हा देखील आपला गुरु असतो. आपला भगवंत आपली काळजी, आपले पालकत्व, आपल्या जीवनाचा कार्य वाह तेव्हाच घेतो जेव्हा आपण श्रद्धेने त्याच्या वर विश्वास ठेवतो, त्याची निःशंक मनाने  भक्ती करतो. ह्या दिवशी आपण आपल्या भगवंतांला गुरुदक्षिणा ही देऊ शकतो. 
तर प्रत्येकाने आयुष्यात एक तरी गुरु हा केलाच पाहिजे. कारण म्हटलंच आहे 'ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला' 
गुरुविण न मिळे ज्ञान, 
ज्ञानाविण न होई जगी सन्मान ... 
जीवन सागर ताराया,
  • चला वंदू गुरुराया... जे जे आपणास ठावे,
ते दुसऱ्यास  देई, 
शहाणे  करून सोडी,
सकळ जना.. 
तोचि गुरु खरा,
आधी चरण त्याचे धरा ... 

💮💮गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💮💮

तारक मंत्र

नि: शंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय स्...